Tuesday, August 28, 2012

कुलंग!! बस नाम ही काफी है.

कुलंग!! बस नाम ही काफी है.
काही वेगळी किंवा जास्त ओळख करून द्यायची गरज नाहि.
४८०० फूटापेक्ष्या जास्त उंची. सह्याद्रीमधील सर्वात जास्त चढ़ान.
सह्याद्री मधे भटकनाऱ्या भटक्याना हे नाव नक्कीच ठावुक असते. कित्येकनासाठी ते ध्येय/ स्वप्न असते. कसलेला ट्रेकरपण कुलंग चढ़ाई अगोदर एक दीर्घ श्वास घेउन सुरवात करतो. ३००० फूटापेक्ष्या जास्त खोल दरी, सरळसोट तुटलेले कड़े.
जास्त कोणी फिरकत नसल्याने वाटा रूळलेल्या नाहीत. आजू बाजुच्या दाट झाड़ीतुन आपली वाट आपणच बनावट जायची.
सप्टेम्बर २००८.
खरे तर जेव्हा कुलंग चा प्लान "ऊर्जा" ग्रुप तर्फे ऑरकुटवर(हो! तेव्हा थोबड़पुस्तक प्रसिद्ध नव्हते/ चालू झाले नव्हते. आठवत नाहि, सर्व भरवसा ऑरकुटवर) प्रसिद्ध झाला, तेव्हा "यंगस्टर" चा रतनगड प्लान होता. पण रतनगड १ दिवसाचा होता. २/३ मित्राना विचारले, कोणता चांगला आहे(जसे काही मी आंबे विकत घेत होता). सर्वानी सांगितले की रतनगड जा. पण लोक जे सांगतील त्याच्या विरुद्ध करायचे हां आमचा खाक्या. हो-हो रतनगड जातो म्हणालो आणि कुलंगसाठी नाव नक्की केले.
यंगस्टर बरोबर आधी ड्यूक्स-नोज केला असल्याने निलेशला ओळख़त होतो, पण नवीन भटके जोडायला कुलंग नक्की केलि. नेट वरून माहिती गोला करायला सुरवात केलि. याआधी नियमित कोणी गडावर जात असल्याची माहिती नव्हती, म्हणजे नेटवर मिळाली नाहि. जी मिळाली त्यातून एवढे नक्की कळले की ५ तासाचा ट्रेक आहे. एक समाधान हे होते की "उर्जा" चा यतिन त्याच्या कोलेज जीवनात इथे आलेला होता.
शुक्रवारी रात्री मुंबई सेन्ट्रल बसस्थानक गाठले. बाकीच्या भटक्यांची ओळख करून घेतली. १२ जण जमले होते. रात्री १2 ची मुंबई सेन्ट्रल- नगर बस पकडली. ट्रेकरच्या धर्माला जागून बस मध्ये गाणी म्हणायला सुरवात केली. भिवंडी येईपर्यंत बिचाऱ्या एकाही प्रवाश्याला झोप आली नसेल. नंतर आमचा पण जोश थोडा कमी झाला. दुसऱ्या दिवसाची वाटचाल बघता आम्ही पण आमचे गळे आवरते घेतले. पाहते ३/३.३० च्या आसपास घोटीला उतरलो. घोटीला बस चा थांबा नसल्याने आम्हाला हायवेवरच उतरवण्यात आले. हायवेपासून घोटी स्थानक १ किमी आतमध्ये आहे. अंधारात आमची पायपीट चालू झाली. स्थानकावर पोहोचल्यावर काही तिथेच थांबले तर बाकीचे आम्ही पुढच्या प्रवासाची सोय बघायला यतीन बरोबर भटकत होतो. शेवटी एक ४०४ टेम्पो वाला तयार झाला. त्याच्या टेम्पोमध्ये बसून आम्ही पुढे कुरुन्ग्वाडीला निघालो. आम्बेवाडीला पोहोचेपर्यंत पहाट झाली होती. आंबेवाडी पर्यंत रस्ता बरा आहे. पण पुढे कुरुन्ग्वाडीचा रस्ता बराच खराब होता. शेवटी एक ठिकाणी चिखलात गाडी अडकल्यावर आमची टेम्पोतून उतरलो. चिखलातून निघाल्यावर टेम्पो माघारी फिरला. आणि आमचा ट्रेक सुरु झाला. पाऊस नुकताच संपल्याने सर्वत्र हिरवाई दिसत होती. वाटेतील एक ओढ्यामध्ये सर्वजण फ्रेश झाले. सटरफटर खाऊन पुढे निघालो.
IMG_2288.jpg
IMG_2295.jpg
IMG_2299.jpg
IMG_2298.jpg
किशोर ने आणलेल्या दुर्बिणीतून मदनच्या नेढ्याचे उत्तम दर्शन झाले. तसेच मदनाच्या कोरीव पायऱ्यापण. पायऱ्या बघून आणि चिंचोळा मार्ग बघून जायची इच्छा झाली. पण रोपशिवाय जाऊ शकत नाही त्यामुळे पुढच्या वेळेला नक्की ठरवून मार्गाला लागलो. कुलंगला फारसे ट्रेकर्स येत नाही.(२००८ मध्ये खूप कमी, आता बरेच ट्रेक वर्षभरात होतात. अगदी पावसाळ्यामध्ये देखील एक ग्रुप कुलंग करून आलेला आहे. जे कुलंग ला जाऊन आले असतील त्यांना नक्कीच यातील धोका कळत असेल. )
त्यामुळे मळलेली अशी वाट नव्हती. कुरुंगवाडीला पोहोचल्यावर एक मार्गदर्शक(वय वर्षे ८) बरोबर घेतला आणि पुढे निघालो.
IMG_2304.jpg
IMG_2309.jpg
सुरवातीच्या पठारावर चालायला फारसा त्रास होत नव्हता. जसा चढ चालू झाला तशी दमछाक चालू झाली. माती मध्ये बरीच ओल होती, चिखल देखील म्हणता येईल. जरादेखील ग्रीप मिळत नव्हती, सारखे पाय घसरत होते. कोणीही बाकी राहिले नाही. सर्व जण धडपडले. या ट्रेकच्या आधी आणि नंतर परत कोणत्याही ट्रेकला माझी इतकी खराब अवस्था झाली नव्हती. इतक्या दिवसाच्या भटकंती आयुष्यामध्ये पहिल्यांदा मला उद्या उतरायचे कसे हा प्रश्न भेडसावत होता.
IMG_2316.jpg
IMG_2317.jpg
IMG_2320.jpg
खडा चढ, पायवाटेवरील चिखल, शुजवरील उडालेला विश्वास, धपापलेली छाती ,मोकळ्यावर आल्यावर डोक्यावर तापणारे उन, रिकाम्या होत चाललेल्या पाण्याच्या बाटल्या, आणि यात कुलंग चढणारे आम्ही साडे बाराजण (वय वर्षे ८ अर्धे तिकीट)
IMG_2324.jpg
IMG_2326.jpg
IMG_2330.jpg
IMG_2331.jpg
IMG_2337.jpg
१०.३०/११ वाजेपर्यंत कुलंगच्या शेवटच्या चढखाली पोहोचलो. हा चढ चढायच्या आधी थोडा आराम केला. आमच्यातील अर्ध्या तिकिटाला त्याचा मेहनताना देऊन त्याची परत-पाठवणी केली. पोटामध्ये थोडी भर घातली. बजरंगबलीचे नाव घेऊन मोहीम फत्ते करायला घेतली. १२.३० च्या आसपास गडाच्या शेवटच्या टप्पात असणाऱ्या पायऱ्याखाली पोहोचलो. इथे एक छोटीशी पहारेकऱ्यासाठी मोकळी जागा आहे. १०/१५ मिनिटात गडाच्या उध्वस्त दारावाज्यामधून प्रवेश केला. प्रवेश द्वारातून वरती आल्यावरच उजव्या हाताला गडाची मुख्य गुहा आहे, तिकडे वळलो. ५/५.३० तासाच्या वाटचालीनंतर कुलंग फत्ते झाला.
IMG_2341.jpg
IMG_2342.jpg
IMG_2348.jpg
IMG_2352.jpg
वरती पोहोचल्यावर सर्व एवढे थकले होते कि पाणी आणायला जायला पण कोणी तयार नव्हते. गुहेच्या माथ्यावरील आणि बाजूच्या खडकावर सर्वजण आरामासाठी झोपले. २०/२५ मिनिटा नंतर कोणीतरी पाणी घेऊन आला होता.मला देखील मस्त झोप लागली होती. पाणी आल्यावर शिदोर्या सोडल्या गेल्या, सर्वजण महेशने आणलेल्या चिकन आणि मासळी वर तुटून पडले. ज्यांचा शनिवार होता ते आमचे तोंड बघत राहिले. पोटभर खाणे झाल्यावर परत सुस्ती आली. तिथेच लवंडलो. तासाभराने आम्ही ५ जण गुहेच्या पुढे असणाऱ्या वाड्यासदृश बांधकामाकडे निघालो. पिण्याच्या पाण्याची टाकी इथेच जवळ आहे. येथेच उडीबाबाचा कार्यक्रमपण पार पडला. आता गडाच्या दुसर्या टोकाकडे निघालो. इथेच कुलंगवरील पाण्याचा बंधारा आहे. पुरातन काळातील बांधकाम आहे. गडाच्या वरच्या अंगाने येणारे पावसातील पाणी २ मोठ्या टाक्यामध्ये साठवायचे. आणि टाकी पूर्ण भरली कि जास्तीचे पाणी खालच्या अंगाला असणाऱ्या बांधामध्ये सोडायचे. बांध भरला कि बाकीचे पाणी पन्हाळीद्वारे दरीत सोडायची सोय आहे.
IMG_2356.jpg
IMG_2358.jpg
IMG_2361.jpg
IMG_2363.jpg
IMG_2374.jpg
IMG_2376.jpg
IMG_2388.jpg
या टोकावरून मदनगड, अलंगचा सुरेख नजरा दिसत होता. सूर्यास्त बघून गुहेकडे परतीला लागलो. छोटा स्टोव असल्याने गडावर जाताना आम्ही जास्त लाकूडफाटा बरोबर नेला नव्हता. पण जशी संध्याकाळ झाली तशी थंडी वाढू लागली. मग जराशी वाळलेली झुडुपे आणि काटक्या गोळा करून गुहेकडे आलो. आमचा विचार तर मोकळ्या मैदानात झोपायचा होता, पण वाढती थंडी आणि सकाळच्या दवाची भीती होती. गुहेच्या आतमध्ये बघितले एक कोपर्यात पाणी साठलेले आणि बाकीची जमीन पण ओलं घरून होती. यावरती उपाय म्हणून आम्ही गुहेसमोर वाढलेले गवत उपटून गुहेमध्ये अंथरायला सुरवात केली. यात दुहेरी फायदा होता. आम्हाला ओल्या जमिनीपासून सुटका मिळाली असती आणि नंतर कोणी ट्रेकर आले तर त्यांना तोपर्यंत वाळलेले गवत पण आयते मिळाले असते.
IMG_2389.jpg
IMG_2392.jpg
IMG_2395.jpg
IMG_2401.jpg
चांगला फुटभर जाडीचा गवताचा थर झाल्यावर आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो. जेवण म्हणून मागि बनवायचा विचार होता, पण भूक एवढी होती कि त्याऐवजी सकाळी नाश्ताला बनणारे पोहे रात्रीच्या जेवणासाठी बनवायचे ठरले. जेवणं अगोदर चहाची तलफ भागवण्यात आली. एकीकडे जेवण बनते आहे आणि दुसरीकडे पोटातील कावळ्यांना शांत करण्यासाठी शिल्लक राहिलेले सटरफटर खात होतो. पोहे बनल्यावर थाळी मध्ये घेऊन ( नंतर थाळी धुवायचा त्रास कोण घेणार ) खाण्यापेक्ष्या एक जाड वर्तमान पत्रावर घेतले. जशी खाण्याची तयारी पूर्ण झाली, बाकीच्यांकडे न बघता सर्व भुक्कड सुटले. मुठीमुठी भरून बकाणे कोंबायला लागले. पोटभर खाल्ल्यावर शेकोटीची तयारी सुरु केली. कसेबसे ओल्या लाकडांना पेटवले आणि ट्रेक मधील खरी मजा शेकोटीभोवती सुरु झाली. गाणी, गप्पा, नकला, जुन्या ट्रेकच्या आठवणी काढत रात्र जागवत होतो. फारशी लाकडे नसल्याने लवकरच शेकोटी मंद झाली आणि थंडीचा कडाका वाढू लागल्याने झोपायची तयारी सुरु झाली.
IMG_2408.jpg
IMG_2418.jpg
IMG_2420.jpg
IMG_2422.jpg
सकाळी ६ च्या आसपास खरे तर माझी उठायची इच्छा नसतानाहि उठलो. खोटे कशाला बोलू, सूर्योदय बघायची अजिबात इच्छा नव्हती. पण निसर्गाची हाक जरा लवकरच आल्याने गुहे बाहेर आलो तर बाजूच्या दरीत हा अद्भुत ढगांचा खेळ चालू होता. एक कोपर्यातून धावत येणारे ढग कळसुबाई डोंगर रंगेमधील चिंचोळ्या वाटेतून लुप्त होत होते. ढगांची माराथोन चालू होती. बाकी भान विसरून तेच बघत बसलो. मधेच बाकीचे गुहेतील साथीदारपण सामील झाले.
IMG_2424_0.jpg
IMG_2428.jpg
IMG_2431.jpg
IMG_2442_0.jpg
थोड्याच वेळात मागि ची तयारी सुरु केली. चहा-मागि झाल्यावर गुहेतील कचरा गोळा करून परतीचा प्रवास सुरु करायला घेतला. बाटल्या रिफील झाल्यावर १०/११ च्या आसपास गड सोडला. उतरताना सांभाळून उतरणे हे एकच लक्ष असल्याने कामेराचा क्लिकक्लीकाट बंद होता. काल गडावर जाताना जेवढे टेन्शन उतरायचे आले होते, आज तसे काहीच वाटत नव्हते. फक्त पाय न घसरण्याची काळजी घेत उतरत होतो. ३.३०/४ तासा मध्ये खाली कुरुन्ग्वादी मध्ये आलो. आणि चालू झाली दमछाक करणारी डांबरी वाट. मध्ये एक ठिकाणी एक आजोबा भेटले त्यांनी एक शोर्टकट सांगितला. त्या वाटेने आंबेवाडी मध्ये येऊन दाखल झालो. तिथेच तासाभराने घोटीला जाणारी बस येऊन दाखल झाली.
IMG_2449.jpg
IMG_2460.jpg
IMG_2462.jpg
IMG_2469.jpg
IMG_2478.jpg
१.३० तासामध्ये घोटीला पोहोचलो. घोटीहून एक काळी-पिवळी ठरवली आणि कसाराच्या मार्गाला लागलो. वेळेत ट्रेन पकडनाच्या नादात दुपारच्या जेवणाची आहुती द्यावी लागली. कसे बसे आम्हाला कसारा ट्रेन मिळाली.
IMG_2491.jpg
IMG_2499.jpg
IMG_2512.jpg
काही वेगळे करण्याच्या नादात खूपच चांगला ट्रेक झाला. नवीन सोबती मिळाले. त्यासोबत या भागात येण्याचे अजून एक कारण मिळाले. अलंग-मदन
IMG_2299_0.jpg

Tuesday, January 10, 2012

राजगड-तोरणा

हा ट्रेक मी आणी माझ्या मित्राने २४-२५-२६ जानेवारी २००९ ला केला होता.

मागच्या वेळी राहून गेलेला राजगड - तोरणा ट्रेक यावेळी पूर्ण करायचा या इराद्याने भिडू जमवू लागलो. मागच्या वेळेच्या सर्व सोबत्यांना विचारून झाले होते, १ खोप्या( श्वेताल खोपकर) सोडला तर बाकी प्रत्येकाचे काही ना काही काम होते, त्यामुळे शेवटी मोजणी दोघांवरच संपली. Show Must Go On च्या धर्तीवर दोघेच जाऊ असे ठरले.

जायच्या आदल्या दिवशी खोप्याच्या डोक्यात किडा वळवळला कि आपण night ट्रेक करुया. मला पण काही हरकत नव्हती , त्यामुळे राजगड रात्री चढायचे नक्की केले. खोप्याच्या मते आम्ही ट्रेन ने पुण्याला जावून तिथून स्वारगेटहून सुटणारी स्वारगेट - वेल्हे बस पकडूया, पण मला ट्रेन - PMT - बस - जीप प्रवासाचा कंटाळा वाटला. माझ्या मते मुंबई सातारा बस ने नसरापूर फाट्याला उतरून तिथून जीप घ्यावी. शेवटी खोप्याच्या डोक्यात मी माझी कल्पना उतरवण्यात यशस्वी झालो.

२४ ला दुपारपर्यंत दादर मध्ये उंडगलो. दुपारी ४ ची बस पकडली, साधारण ७:30 च्या दरम्यान नसरापूर ला पोहोचू असा अंदाज होता. पण मुंबई च्या ट्राफिक मधून बाहेर पडायला ६:३० झाले , जरा मोकळा श्वास घेतो तो परत पनवेलला परत चक्का-जाम . गाडी मेगा हायवे लागेपर्यंत ८:३० झालेले. वाटले आज काही रात्री ट्रेक चालू करता येणार नाही. नसरापुरला पोहोचे पर्यंत ११:३० झाले होते. एखादी तरी जीप असावी अशी प्रार्थना मी करत होतो पण आशा फोल ठरली. एकही वाहन नव्हते तिथे.

महाराजांचे नाव घेऊन आणि खोप्या च्या शिव्या ऐकत चालायला सुरवात केली. जिथपर्यंत जाऊ शकू तिथपर्यंत जाऊया आणि काही आसरा मिळाला तर मुक्काम करुया असे ठरले. १० मिनिटे चाललो नवतो तोवर मागून बाईक चा आवाज येवू लागला. त्याच्या कडे आम्ही लिफ्ट मागितली. हा पुण्याचा ग्रुप होता जो तोरणाला चालला होता. मग काय ट्रिपल सीट बसून प्रवास चालू केला. त्यांनी आम्हाला मार्गासनीला(?) सोडले. तिथे १ ओमनी वाल्याला गुंजवणेला सोडायला तयार केले (यासाठी २०० रु घेतले त्याने) . १२:३० ला गुंजवणेला पोहचलो. पोहोचल्या बरोबर तेथील दृश्य बघून सुखद धक्का बसला. पायथ्याला शिवप्रतिस्थान (मला नक्की नाव आठवत नाही आहे) आणि गाववाल्यांच्या मदतीने प्रत्येकाची तपासणी चालू होती. सिगारेट आणि दारू जप्त करत होते. इमानदारी मध्ये विचारल्या बरोबर जे काढून देत होते त्यांना सोडत होते. पण दारूवाल्यांना उठाबश्या काढायची शिक्श्या होती, आणि जे नाही बोलून ज्यांच्याकडे सापडली त्यांची धुलाई होत होती.

आमची तपासणी झाली व गडावर जायचा मार्ग मोकळा झाला. अंधारामध्ये चढायला सुरवात केली. थंडीचे दिवस आणि रात्र यामुळे थकवा फारसा जाणवला नाही. गप्पा मारत, एकमेकांची टर उडवत २:४५ ला चोर दरवाज्यामधून गडावर प्रवेश केला. पद्मावती माचीवर जाऊन बघितले तर तिथे जत्रा होती. सगळ्या जागा फुल झाल्या होत्या. मंदिर आतून बंद होते, बाहेरील मोकळ्या जागेवर तंबू ठोकले होते. एकही जागा शिल्लक नव्हती. दारूकोठाराची जागा भरली होती.

शेवटी सदरेच्या बाजूच्या मोकळ्या जागेवर मुक्काम ठोकला. झोप तर येत नवती मग असाच वेळ काढत होतो, जानेवारी महिना असल्याने थंडी खूप होती. शेकोटीसाठी काही मिळते काय ते शोधायला लागलो. थोडे गवत, वाळक्या काट्या, १ छोटा ओंडका मिळाला, पण जो पेटवता पेटवता आमच्याकडील अर्धे रॉकेल संपले. ४ वाजेपर्यंत ओंडक्याशी झगडलो. शेवटी त्याचा नाद सोडून झोपायची तयारी चालू केली, दुसर्या दिवशी बराच मोठा पल्ला गाठायचा होता. बोचके उपसले तर माझ्या लक्ष्यात आले के पांघरायची चादर विसरलो आहे. आता बोंबला! एवढ्या थंडीत काय करायचे. खोप्या ने मनातल्यामनात मला नक्कीच शिव्या देऊन बोलला असेल काय YZ आहे हा. खोप्याला थोडा मस्का लावून त्याच्या चादरी मध्येच घुसलो. पण थंडी काही झोपायला देत नव्हती. कसाबसा १/१.५ तास झोप झाली असेल, सकाळच्या दवाने मात्र पूर्ण वाट लावली. शेवटी सकाळी ६ च्या आसपास झोपायचा नाद सोडून सूर्योदयाची वाट बघू लागलो.
DSCF6922.jpg

DSCF6929.jpg
DSCF6935.jpg

शहरातील सूर्योदय आणि गडावरील सूर्योदय यातील फरक शब्दामध्ये सांगण्याची माझी पात्रता नाही आहे. पण हा अनुभव मला खूप आवडतो. एकटक त्या आकाशामध्ये त्या राजाला विराजमान होताना बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. खोप्या सूर्योदयाचे फोटो काढण्यामध्ये मग्न होता, मीपण जरा फोटोग्राफी करून घेतली. सर्व आवरून बोचके बांधले. आणि संजीवनीमाची कडे प्रयाण केले. मागील वेळी राजगड - तोरणा बेत हुकल्याने मस्त ३ दिवस राजगडवर भटकलो होतो. आताही माझा कमीत कमी बालेकिल्ला तरी बघू हा बेत खोप्या ने हाणून पडला आणि आम्ही ८:३० ला तोरण्याला वाटचाल चालू केली.

DSCF6945.jpg
DSCF6950.jpg
DSCF6952.jpg
तोरणा (राजगड वरुन)
DSCF6952.jpg

DSCF6960.jpg
DSCF6966.jpg
DSCF6970.jpg
DSCF6987.jpg

अंदाजानुसार ३० मिनिटे अळू दरवाजा - ५ तास मधल्या टेकड्या ते बुधला माची - १ तास बुधला माची ते मेंगाई देवी मंदिर. प्लान तर मस्त तयार होता, पण ट्रेक मध्ये कधीही एवढा वेळेबरोबर प्लान चालत नाही. आणी खासकरून जर किल्ले राजगड असेल तर. फोटो काढत, बुरुजावरून देखावा बघत आमची वाटचाल चालू होती. दुहेरी तटबंदीमधील जागेमध्ये उतरत होतो. हो - नाही करत १०:३० च्या आसपास अळू दरवाज्यामधून बाहेर पडलो. रस्ता तर स्पष्ट दिसत होता, फक्त तो कसा पार करायचा ते आमच्यावर होते.

DSCF6974.jpg
DSCF6975.jpg
DSCF6990.jpg

सुरवातीचा रस्ता थोडासा उतरणीचा होता, तिथे काही विशेष त्रास नव्हता. फक्त एके ठिकाणी जरा घसरण जास्त होती. ४५ ते ५५ मिनिटामध्ये आम्ही डांबरी रस्तावर उतरलो, हीच पाली खिंड. एका बाजूला पाली गाव व दुसर्या बाजूस भुतोंडे गाव आहे. इथे पहिला छोटा ब्रेक घेतला. इथून एक सरळ पायवाट जात होती. पहिल्यांदा सरळ पायवाटेने पुढे गेलो पण नंतर थोडे चालल्यावर लक्षात आले कि वाट बरोबर नाही आहे. परत मागे फिरलो आणी खिंडीमध्ये परत आलो. निरखून बघितल्यावर थोड्या पुढच्या बाजूला एका छोट्या पायवाटेच्या इथे तोरणा चा बाण होता. हाच रस्ता मग आम्ही घेतला.

DSCF6995.jpg
DSCF6997.jpg
DSCF6998.jpg

किती अंतर चाललो होतो ते माहिती नाही. थोड्याच वेळात एक घर लागले. आवाज देऊन, डोकावून बघितले तर तिथे कुणीच नव्हते. थोडे अंतर पुढे गेल्यावर एक मावशी भेटल्या त्यांना पाणी कुठे जवळपास आहे का ते विचारले. अरे एक छोटा किस्सा सांगायचा राहून गेला. खोप्या महाशयांनी जी झोळी आणली होती तिचे बंद खूप बारीक होते, त्यामुळे पाठीला खूप त्रास होत होता. शेवटी त्याच्याकडे १ टोप, २ ताट, चमचे, खिचडीचे सामान, १ लिटर पाणी एवदाच बोझा होता. आम्ही माझ्याकडे फक्त ७ लिटर पाणीच होते. स्वतःचे बाकीचे सामान स्वतःकडेच होते. तर मावशी बोलल्या कि थोडे पुढे गेले तर विहीर आहे. पण आम्ही ती विहीर शोधायच्या भानगडीमध्ये पडलो नाही. गाववाल्यांचे ५ मिनिटाचे अंतर म्हणजे आपले कमीत कमी २० मिनिटाचे असते हा अनुभव अगोदर खूप वेळा घेतला होता.

आमची पायपीट चालूच होती. एक ठिकाणी थोडीशी सावली बघून जेवणाचा बेत केला. लगेच बांधून आणलेले ठेपले, भाजी-चपाती, बाहेर काढली आणी तुटून पडलो.सकाळी काहीही खाल्ले नव्हते आणि परत एवढी पायपीट, खाणे जरा जास्तच झाले. सर्व आवरून पुढे निघायची तयारी केली तर खोप्या बोलला कि त्याला थोडा आराम करायचा आहे. रात्री झोप झाली नव्हती आणी पुढची वाटचाल लक्षात घेता मी पण जास्त ताणले नाही. साहेब २ मिनिटाच्या आत घोरायलापण लागले आणी माझ्या झोपेची वाट लावली. चांगला ३०-४० मिनिटांचा ब्रेक झाला होता खोप्याला उठवले आणी पुढे चालायला सुरवात केली.

DSCF6999.jpg

राजगड वरून निघून आता आम्हाला ४ तास झाले होते तरीही बरेच अंतर बाकी होते. मध्येच एक ठकाणी एक ताकवाला पोरगा भेटला त्याला विचारले जवळपास पाणी कुठे मिळेल कारण आता फक्त ३ लिटर पाणी शिल्लक होते. तो बोलला कि जवळच एक घर आहे ठीथे मिळेल पाणी. आम्ही लगेचच त्या घराकडे निघालो. तिथे गेल्यावर तिथल्या आजीनी ताक आणि पाणी दिले. त्यांना सहज विचारले कि तुम्ही पाणी कुठून भरता? त्या बोलल्या कि टेकडी उतरून खाली जावे लागते तिथून भारतात पाणी. पुदाचा रस्ता नीट विचारून घेतला आणि किती पैसे झाले ते विचारले? त्या बोलल्या तुम्हाला जसे बरे वाटेल तसे द्या. शेवटी त्यांना ५०रु.( ४ ताक आणी ३लिटर पाणी ) देऊन पुढे निघालो. शेवटच्या टप्प्यात सावली बिलकुल नाही. त्यामुळे लवकरात लवकर बुरुजाच्या सावलीत जायचा विचार होता. या टप्प्यामध्ये एक ठिकाणी खोप्या थोडा घसरला पण काही दुखापत नाही झाली. थोडा चढ चढायचा कंटाळा म्हणून दरीच्या बाजूने जाणारी वाट घेतली होती . माती जास्त भुसभुशीत असल्याने पाय घसरला.

DSCF7000.jpg
DSCF7002.jpg
DSCF7014.jpg
DSCF7019.jpg

थोड्याच वेळात बुधला माचीच्या बुरुजाखाली आलो. इथे परत १ मोठा ब्रेक घेतला कारण वरती चढताना एक rock patch पार करायचा होता. फ्रेश होऊन वरती निघालो. तिथे एक ग्रुप अगोदरच वरती जायचा प्रयन्त करत होता. त्यांच्या मधील काहीना तो patch करायला त्रास होत होता, कारण थोडे जरी घसरले तर मागे दरी होती.(आता या ठिकाणी शिडी लावली आहे असे वाटते यो चे फोटू बघून) खोप्याने कासरा(जनावरांना बांधन्यासाठी वापरायचा दोर) आणला होता तोच मग वरती बांधला. दोराच्या आधाराने ट्राफिक मोकळी होऊ लागली. माझ्यातले किडे गप्प बसायला तयार नव्हते म्हणून दोराचा आधार ना घेता वरती चढलो. सर्व वरती आल्यावर दोर गुंडाळून मेंगाई देवीच्या मंदिराकडे चालू लागलो.

DSCF7023.jpg
DSCF7026.jpg
DSCF7025.jpg

मंदिराकडे जाताना ३ जणांचा ग्रुप भेटला त्यांनी वाटेतील rockpatch चुकवून पुढे जायचा रस्ता सांगितला. वाटेत लागणाऱ्या ३ टाकी पासून उजवीकडे वळून जायचे. हि वाट तटबंदीवरून दरीच्या कडेने जाणारी वाट होती. आमच्या पुढे २५ जणांचा ग्रुप गेला होतास, त्यामुळे ट्राफिक ने वाया जाणारा वेळ वाचावलन्यासाठी आम्ही तटबंदीवरून निघालो.

DSCF7029.jpg
DSCF7036.jpg
DSCF7045.jpg

संध्याकाळ झाल्याने वारा जोरदार होता. आणि कडेला वाढलेल्या झाडीमुळे सावकाश सांभाळून जावे लागत होते. लवकरच कोंकण दरवाजा पार करून मंदिराच्या अंगणात आलो.
घड्याळ बघितले तर आम्हाला राजगड वरून निघून आता ७ तास झाले होते. आणी अगोदर काय वेळापत्रक आंम्ही मांडले होते. पटापट फ्रेश होऊन सूर्यास्त बघायला गेलो. जाताना नवीन सेल टाकायचे विसरल्याने आणी परत मंदिरात जाऊन आणण्याचे कंटाळा आल्याने सूर्यास्ताचे फोटो काढता आले नाही.

DSCF7061.jpg

सूर्यास्तानंतर पेट्पुजेची तयारी चालू केली. सर्वप्रथम सूप बनवण्यास घेतले. रेडीटूइट सूप ढोसल्यावर खिचडीची तयारी चालू झाली. जेवण बनवायच्या फांद्यात मी कधी पडत नाही. हे पूर्णपणे खोप्याचे खाते आहे. त्याने मस्तपैकी राजगड स्पेशल खिचडी(मागच्या राजगड फेरीच्या वेळी आम्ही दिलेले नाव) बनवायला घेतली. नेहमीसारखीच खोप्याने खूप चांगली खिचडी बनवली. (हा त्याचा चांगला गुण त्याला खूप त्रास देतो, कारण जेव्हा पण आम्ही सर्व टाळकी त्याच्या घरी जमतो तेव्हा तेव्हा त्याला खिचडी बनवावी लागते) जेवण करून, आवरून दुसऱ्या कोल्हापूरच्या ग्रुप बरोबर गप्पा मारत बसलो. मधेच तोरण्याच्या भुताचा पण विषय निघाला पण त्याकडे कोणीच जास्त लक्ष दिले नाही. ११ वाजता झोपायला परत मंदिरा मध्ये गेलो. दिवसभरच्या थकव्याने झोप लवकरच लागली.
DSCF7070.jpg
DSCF7071.jpg
DSCF7075.jpg
DSCF7076.jpg

सकाळी लवकर जाग आली आणी सूर्योदय बघायला धाव घेतली. बर्यापैकी उजाडल्यावर बघितले तर बाजूच्या मोकळ्या जागेत २६ जानेवारीचा झेंडावंदनाचा कार्यक्रम होणार होता. आम्हीपण आवरून झेंडावंदनाला गेलो. हातात एवढा वेळ नव्हता कि झुंजार माचीवरजाऊन परत येता येईल. त्यामुळे झुंजारमाचीचे दुरूनच दर्शन घेऊन गड उतरायला सुरवात केली. (पुढच्यावेळी तोरण्याला यायला निमित्त आहे ना झुंजारमाचीचे तसेच तोरणा पण बघायचा आहे).

DSCF7080.jpg
DSCF7084.jpg
DSCF7090.jpg
DSCF7100.jpg
DSCF7091.jpg
DSCF7095.jpg

उतरताना ठिकठिकाणी रेलिंग लावले आहेत त्यामुळे एवढे थरारक वाटत नाही पण दरी असतेच समोर. २/२.३० तासात खालच्या पठारावर आलो तिथून तर सोपा रस्ता आहे.
DSCF7104.jpg
DSCF7118.jpg
DSCF7131.jpg
DSCF7134.jpg

गावात आल्यावर एक विहीवर फ्रेश झालो आणी काळीपिवळी पकडून नसरापूर फाट्याला आलो. एकही ST बस थांबायला मागत नव्हती. शेवटी कर्नाटक मंडळाची बस थांबली आणी त्यातून परतीचा प्रवास चालू केला.
DSCF7173.jpg
DSCF7176.jpg